Blog
Tavalkhor-Vinay
Blog Posts
Ready to see the world through my lens .
भरकटलेली निवडणूक…
राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत सध्या महापालिका निवडणुकांची चर्चा आहे. सुरुवातीला कोणाला तिकीट मिळणार इथपासून सुरू झालेला राड, नंतर उमेदवार पळवण्यापर्यंत आला. कोणता पक्ष कोणत्या महापालिकेत कोणासोबत नांदत आहे. हे त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांना जरी माहिती असेल, तर जनतेचं नशीबच म्हणावं लागेल. अशी परिस्थिती राजकीय पक्षांनी निर्माण केली आहे. स्वच्छता,पाणी, प्राथमिक शिक्षण या मुद्द्यांवर लढायची निवडणूक राजकीय […]
कोणी तिकीट देता का तिकीट…
‘मोडेन पण वाकणार नाही’. हा इतिहास अभिमानानं सांगणारे मराठे आहोत आपण. पण इथं आपले निष्ठावंत कार्यकर्ते झुकले बी अन् वाकले बी. ३० डिसेंबर महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. पण तो दिवस महाराष्ट्राच्या राजकारणातला वाईट दिवस म्हणावा, की सगळ्यात चांगला तेच मला समजत नाही आहे. तुम्ही म्हणाल वाईट दिवस का म्हणायचं? तर […]
एक भाकर तीन चुली…
कधी शिक्षणासाठी, नोकरीसाठी आपलं हक्काचं गाव सोडलं आहे का? पोटाला चिमटा काढून कधी झोपला आहात का? कधी आयुष्यात असहाय्य झालं आहे का? आई-वडील आहेत, पण मदत करू शकत नाही आहेत. मित्र-मैत्रिणी हतबल आहेत. अन् नातेवाईक, कुठलीही कथा तर सुरूच त्या नातेवाईकांमुळे होते. आणि अशा परिस्थितीत तुम्ही एकटे लढताय, कल्पना करा…. एक भाकर तीन चुली, ही […]
वाचकांसाठी भन्नाट उपक्रम!
आजकाल पहिले सारखं वाचनच होत नाही रे, वेळ कुठे मिळतो. पुस्तकं तर खूप घेऊन ठेवली आहे. पण वाचणार कधी? तुमच्या माझ्यासारखी अशीच प्रश्न अनेकांना पडतात. पण काही फक्त विचार करतात आणि सोडून देतात तर काही जण मात्र त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतात. याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला शंतनू नायडू, गार्गी सांडू आणि त्यांच्या […]
माझी डायरी
व्यक्त व्हायलाचं हवं लहान असताना मला एक गोड सवय होती, शाळेतून आल्यावर नाहीतर, रात्री जेवतांना आज दिवसभरात कायकाय झालं याचा पाढा वाचून दाखवण्याची. पण जसं-जसं मोठा होत गेलो, शाळा ही सुटत गेली आणी त्याच सोबत ती सवय ही, पण आवश्यक असतं असं कुठे तरी, कोणा जवळ व्यक्त होता येणं. पण आज कोणाकडे सुख-दुखः समजुन घ्यायला […]
दशावतार!
माझा जन्म विदर्भातला, माझं गाव तर अगदी विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरच. लहानपणी मी निसर्ग म्हणजे सुकलेली झाडं आणि वाळलेली पिकं या पलीकडे काही पाहिला नाही. आठदिवसा आड पिण्यासाठी मिळणारं पाणी, आटलेले तलाव आणि विहीरी यापलीकडे फार काही पाहिलं नाही. विदर्भ, मराठवाड्यात डोंगरदऱ्या, निसर्ग नाही अशातला भाग नाही. पण जो निसर्ग कोकणाला लाभलाय, ज्या प्रकारे तो तिथल्या […]
बाप्पा,मंडळ आणि ते १० दिवस…
काल गावातल्या मित्राचा कॉल आला. त्याला म्हंटलं कशी चालू आहे गावात गणपतीची तयारी? तो कॉलवर बोलत होता, पण माझं मन सगळं लहानपणीच्या आठवणीत गुंतलं होतं. चौथीत असताना चार मित्रांनी मिळून गणपती मांडायला सुरुवात केली होती. घरासमोरच्या वरांड्यातच, फार मोठा मंडप नाही. वर्गणी दिली तितकीच घ्यायची आणि ठरलेल्या बजेटमध्ये सगळं गणित बसवायचं. मोठा प्रसाद नाही, डीजेवैगरे […]
पोळा…
हिंदू सणांपैकी एक लुप्त होत असलेला सण…म्हणजे बैलपोळा. शहरात सगळ्या सणांचे इव्हेंट झाले. देशभरातून अनेक लोक, ब्लॉगर दहीहंडी, गणेशोत्सवाचे सण नव्हे तर इव्हेंट पहायला मुंबई, पुण्यासारख्या शहरात येतात. पण पोळा या सणाचा इव्हेंट होऊ शकला नाही. का? कारण हा सण शेतकऱ्यांचा आहे. हा सण बैलांचा आहे. हा सण त्या लोकांचा आहे. जे लोक जगले काय […]
घरचा दौरा…
सहामाही परीक्षेसारखं सहा महिन्यातून एकदा घरी यायचं, अन् गणिताचा पेपर विद्यार्थ्यांना छळतो तसं आईला छळायचंअगं हे नाही गं ते कर खायला म्हणून गळा काढायचा, अन् तिनं उत्साहानं काही केलं की आपण आदाशा सारखा ताव मारायचा मेसचं जेवण खाऊन कंटाळलेल्या या देहाला आज तिच्या हातची कार्ल्याची भाजीपण गोड लागली, हं…तुला त्या काकूसारखं जमतच नाही बा म्हणणाऱ्या […]
स्वातंत्र्यदिन…
आज स्वातंत्र्यदिन, कधीकधी वाटतं यार उगाच मोठे झालो ना. कारण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी लहानपणीचा उत्साह कमाल असयचा. म्हणजे मला तर १५ ऑगस्टपेक्षाही….१४ ऑगस्टची फार गंमत वाटायची. ये भाई पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो म्हणून नाही काही….तर आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या तयारी करण्याची मजाच वेगळी होती म्हणून. १४ ऑगस्टला आमच्या शाळेत गणवेश नसला तरी चालायचा, मग रंगबिरंगी कपड्यातली सगळी मुलं […]









